जिल्हाप्रमुख गोपाल पाटिल अरबट यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश

जिल्हाप्रमुख गोपाल पाटिल अरबट यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश
अमरावती(प्रतिनिधी)-शिवसेना मुख्य नेते,उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वतीने नियोजनपूर्वक तयारी सुरू केली आहे.
याच पार्श्वभमीवर अमरावती जिल्हा शिवसेना यांच्या वतीने जिल्हा प्रमुख गोपाल पाटील अरबट यांच्या नेतृत्वात ७ जुन रोजी आढावा व नियोजनात्मक बैठकीचे आयोजन विश्रामगृह अमरावती येथे करण्यात आले होते.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवसेना नेत्या प्रितीताई बंड तर प्रमुख पाहुणे म्हणून सहसंपर्क प्रमुख रविभाऊ गणोरकर होते.

 
या प्रसंगी पदाधिकारी व शिवसैनिकांना मार्गदर्शन करतांना जिल्हाप्रमुख गोपाल पाटील अरबट यांनी कडक सुचना दिल्या.आपल्या भाषणात त्यांनी मला कोनत्याही परिस्थितीत येणा-या महानगरपालीका, नगरपरिषदा, जि परीषद, पंचायत समिती,एवढेच नव्हे तर सरपंच पदाच्या निवडणुकीत सुध्दा शिवसेनेचे प्रतिनिधी विजयी हवे आहेत.त्या अनुषंगाने प्रत्येकाने कामाला लागुन प्रत्येकाने आपापल्या कार्यक्षेत्रात प्रभावी पणे कार्य करा असे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले.
आपल्याला पक्षाने ज्या ज्या पदावर नियुक्ती करुन कामं करण्याची संधी दिली त्या संधिचे सोने करा व आपल्या पदाला न्याय द्या असे आवाहन करतांनी दर पंधरा दिवसानी आपल्या कार्याचा आढावा घेण्यात येईल,त्या मधे कामकुचार पणा केल्यास अशा अकार्यक्षम पदाधिकाऱ्यांना पदावरुन कमी करण्याचा इशारा सुध्दा जिल्हा प्रमुख गोपाल पाटिल अरबट यांनी दिला.
 
या पुढे बोलतांना मला कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक संस्थेवर शिवसेनेचे प्रतिनिधी हवे आहेत त्याकरीता सर्वांनी सदस्यता नोंदनी करुण गाव तिथे शाखा घर घर शिवसेना हा उपक्रम राबवून जनसंपर्क वाढविण्याचे आवाहन सुध्दा केले.
 
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बोलतांना शिवसेना नेत्या प्रिती ताई बंड यांनी आपले अनुभव विषद करताना शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री मा एकनाथजी शिंदे यांचे कौतुक करुण शिंदे साहेबच आपल्याला न्याय देऊ शकतात,एकनाथजी शिंदे साहेबांचे हात बळकट करण्याकरीता सर्व गटबाजी विसरुन जिल्हा प्रमुख गोपाल पाटिल अरबट यांच्या आदेशाचे पालण करुण प्रत्येकाने कामाला लागा,आपल्याला गोपाल अरबट सारखा सर्वसामान्य लोकांना न्याय देणारा जिल्हा प्रमुख लाभलेला आहे.
आता गरज आहे फक्त आपल्याला कामं करण्याची म्हणुन सर्वांनी कामाला लागा असे आवाहण केले,कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालण ऊप जि प्रमुख सुनिल केने यांनी तर आभार प्रदर्शन शहर प्रमुख आशिष ठाकरे यांनी केले.
 
या प्रसंगी सहसंपर्क प्रमुख रवि भाऊ गणोरकर,राजेंद्र गायगोले, उपजिल्हाप्रमुख सुनील केने गुरुजी यांनी मार्गदर्शन केले.
 
या बैठकीला बहुसंख्य शिवसैनिक व पदाधिकारी हजर होते.यात जिल्हाप्रमुख गोपाल अरबट,प्रितीताई बंड,सहसंपर्क प्रमुख रवी गणोरकर, राजेंद्र गायगोले,युवा सेना लोकसभा अध्येक्ष प्रवीण दिधाते महिला आघाडिच्या जि प्रमुख अरुणा ईंगोले, रेखाताई खारोडे, जयश्री कातखिडे, मदत कशाच्या सोनाली देशमुख, ऊपजिल्हा प्रमुख केने गुरुजी, शहर प्रमुख आशिष ठाकरे, शहर संघटक मुकेशभाऊ ऊसरे अमोल भुयार महानगरप्रमुख रश्मी तायडे सारिका जयस्वाल भारती विश्वकर्मा संगीता गावंडे संगीता मडावी मीनाक्षी कपले मनोज पांडे राजेश सूर्यवंशी चंद्रशेखर आसोले गजानन कात्रे गजानन मोरे गणेशराव भुजाडे अविनाश जवंजाळ गजानन सगने प्रवीण कडू गजाननराव देवके सुरेश कडू  सुधीर खंडार महेंद्र भांडे ज्ञानेश्वर अढाऊ अमर करोशिया सरिता मेश्राम रूपाली मुरसकर अलका कलावटे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.